Skip to main content

Posts

Showing posts with the label india

आता परत ते नाही!

आता परत ते नाही! सकाळी सकाळी आई उठवायची, नाही उठलो तर धपाटे घालायची, ओढत ओढत आंघोळीला पाठवायची, आणि धुतलेले कपडे घालून hero सारखा भांग पाडायची! तेव्हाच काय ती मजा होती, आता ते परत नाही! शाळेत सगळे मित्र भेटायचे, कालचे भांडण आज विसरायचे, दुपारी सगळे एकमेकंच्यातलच खायचे, सरांच्या छड्या पण सगळेच घ्यायचे, पण शाळासुटेपर्यंत सगळेच वाऱ्यावर विरून जायचे! खरा आनंद त्यातच होता, आता ते परत नाही! शनिवारी गल्लीत कलकलाट असायचा, विट्टीदांडू, विष-अमृत, लपाछपीचा डाव हमखास जमायचा, bat वाला आलाच तर क्रिकेटदेखील खेळायचा, सगळेच हसत खेळत होते, रुसवा कोणाचाच नसायचा! सगळ तेव्हाच मस्त वाटायच आता ते परत नाही! TV वर शक्तीमान ची वेळ कधीच नाही चुकायची, मोगली ची संधी कधीच नाही हुकायची, पाठीवर शाल गुंडाळून सगळी कार्टी हिंडायची, सगळ व्हायच पण रडू कोणालाच यायच नाही! तेव्हाच खर हास्य होत, आता ते परत नाही! आता सकाळी लवकर उठतो, snooz ४ वेळा तरी दाबूनच ! नाष्टा केला तर होतो नाही तर तो पण नाहीच! corporate वाले मित्र झालेत खूप, पण दोस्त कोणीच नाही! तेव्हाच आयुष्य होत, आता ते परत नाही!

Social Media