Skip to main content

Posts

Showing posts with the label bhaavana

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आपला

बाप्पा दरवर्षी ह्या साठी येतो का!??

चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात. 5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत. नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात

Social Media