माझ्या उभ्या आयुष्यात कधी लेखन करेन असा वाटल नव्हत. म्हणजे लेखन भरपूर केलय, पण ते फक्त शाळेतच. शाळेच्या बाहेर पहिल्यांदा लिहील ते कॉलेज च्या वार्षिक नियतकालिकासाठी. त्या लेखनामुळे कौतुक झाल, मग ठरवल कि स्वतःचा ब्लॉग लिहायचा. सुरुवातीला नुसत ठरवलं पण कृती कोणतीच केली नाही नुसताच विचार करत राहिलो. अगदी भारताच्या संसंदेसारख म्हणजे एखाद्या विधेयकावर विचार करत बसायचं आणि जेव्हा वेळ निघू जाईल तेव्हा त्याला मान्यता द्यायची. म्हणजे मी खूपच उशिरा लिहितोय असा नाही पण माझ्या मते खूप लवकर लिहितोय असाही नाही. आधी तर ब्लॉग लिहायचा कसा ते सुद्धा मला माहीत नव्हतं मग google ची मदत घेऊन ते सुद्धा शिकलो. आणी तिसर्या सत्राच्या सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कायमच काय लिहायचं हे सुचत नाही आणि मग सुरुवात केली की आपोआप सुचायला सुरुवात होते. आता हेच बघा ना.... आज लिहायला सुरुवात केली तेव्हा काय लिहायचं हे अजिबात माहीत नव्हत पण मग काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मग आता एक मोठा परिच्छेद तयार झालाय. सुरुवातीला ह्या आजच्या विषयाला दिलेल्या नावाबद्दल थोडा बोलूया... “ओळख” थोडा उशीर झाल...