Skip to main content

ओळख

माझ्या उभ्या आयुष्यात कधी लेखन करेन असा वाटल नव्हत. म्हणजे लेखन भरपूर केलय, पण ते फक्त शाळेतच. शाळेच्या बाहेर पहिल्यांदा लिहील ते कॉलेज च्या वार्षिक नियतकालिकासाठी. त्या लेखनामुळे कौतुक झाल, मग ठरवल कि स्वतःचा ब्लॉग लिहायचा. सुरुवातीला नुसत ठरवलं पण कृती कोणतीच केली नाही नुसताच विचार करत राहिलो. अगदी भारताच्या संसंदेसारख म्हणजे एखाद्या विधेयकावर विचार करत बसायचं आणि जेव्हा वेळ निघू जाईल तेव्हा त्याला मान्यता द्यायची. म्हणजे मी खूपच उशिरा लिहितोय असा नाही पण माझ्या मते खूप लवकर लिहितोय असाही नाही.

आधी तर ब्लॉग लिहायचा कसा ते सुद्धा मला माहीत नव्हतं मग google ची मदत घेऊन ते सुद्धा शिकलो. आणी तिसर्या सत्राच्या सुरुवातीला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कायमच काय लिहायचं हे सुचत नाही आणि मग सुरुवात केली की आपोआप सुचायला सुरुवात होते.
आता हेच बघा ना....
आज लिहायला सुरुवात केली तेव्हा काय लिहायचं हे अजिबात माहीत नव्हत पण मग काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मग आता एक मोठा परिच्छेद तयार झालाय.
सुरुवातीला ह्या आजच्या विषयाला दिलेल्या नावाबद्दल थोडा बोलूया...
 “ओळख”
थोडा उशीर झालाय ओळख करून द्यायला असा वाटत असेल ना तुम्हाला...? हो मला ही तेच वाटतय...पण असो माझ्या बद्दल तुम्हाला काय ओळख करून द्यायची म्हणून आधी करून दिली नाही पण आता असा वाटायला लागलाय की माझ्या ब्लॉग ची सगळ्यांना झाली पाहिजे आणी त्यासाठी ही ‘ओळख’.
आज ५ महिने झाले ब्लॉग लिहितोय आणि हा माझा कदाचित १० – ११ वा ब्लॉग असेल.
पण इतक्या दिवसात एक गोष्ट लक्षात आलीय की लेखकान लिहीत राहिला पाहिजे, ते चांगला आहे की वाईट आहे ते वाचकच ठरवतील, पण लिहिणा महत्वाच. मी सुद्धा मधले २ महिने काहीही लिहिला नाही पण मग असा वाटायला लागला की लिहिला पाहिजे कारण मी लिहिला नाही तर माझ्या मित्रांना वाचायची सवय कशी लागेल... ;-) ;-) हा म्हणजे माझ लिखाण काही खूप विचार करण्यासारख असत असा काही नाही पण तरीही....


Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media