Skip to main content

बाप्पा दरवर्षी ह्या साठी येतो का!??

चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात.

5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत.

नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात पण उच्चारही ऐकू येत नाहीत.

रोज त्याला स्वतः साठी तर मागतोयच पण मग एक दिवस ह्या माग पडलेल्या समाजासाठी काहीतरी मागा! दुष्काळ हटवण्यासाठी पावसाची मागणी करा, त्या दुर्लभ आणि दुर्लक्षित लोकांसाठी काहीतरी मागा! गणपती ला lighting तर सगळेच करतात पण मनातला निर्मळ भाव का कमी पडतो...?

ह्या गणेशोत्सवाला चला ह्या समाजाला जाग करूया! त्यांना पण हा प्रश्न पडायला हवा, "बाप्पा दरवर्षी ह्या साठी आपल्याकडे येतो का!??"

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media