Skip to main content

बाप्पा दरवर्षी ह्या साठी येतो का!??

चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात.

5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत.

नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात पण उच्चारही ऐकू येत नाहीत.

रोज त्याला स्वतः साठी तर मागतोयच पण मग एक दिवस ह्या माग पडलेल्या समाजासाठी काहीतरी मागा! दुष्काळ हटवण्यासाठी पावसाची मागणी करा, त्या दुर्लभ आणि दुर्लक्षित लोकांसाठी काहीतरी मागा! गणपती ला lighting तर सगळेच करतात पण मनातला निर्मळ भाव का कमी पडतो...?

ह्या गणेशोत्सवाला चला ह्या समाजाला जाग करूया! त्यांना पण हा प्रश्न पडायला हवा, "बाप्पा दरवर्षी ह्या साठी आपल्याकडे येतो का!??"

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media