दुकानात फक्त Parle-G चा पुडा आणायला गेलेलो, आणि पावसाने अचानक जोर धरला. भिजत जाव की नको असा विचार मनात आला पण म्हणल की कधी एवढ पळत जायच! जरा कमी आला की जाऊया म्हणून तिथेच थांबलो. जवळच मुलींची शाळा असल्यामूळे दुकानात गिर्ह्राईकांच्या ऐवजी मुलींचीच गर्दी अधिक. बघितल तर ८-९वी तल्या मुली असाव्यात, एकीने दप्तरामधून एक मोठा मोबाइल बाहेर काढला तो मोबाईल बघून चाटच पडलो. एवढा ग्रज्युएट झालोय पण अजून एवढा भारीतला मोबाईल घ्यायच धाडस होत नाही माझ आणि ही मुलगी अगदी हसत खेळत मोबाईल वापरत होती. तेवढ्यात तीला कोणाचातरी call आला, "हो अरे भिजत नाहीये मी, दुकानात थांबले एका!" तिकडून कोणितरी तीला भिजू नको अस सांगत होत. मला वाटल भाऊ, वडील वगेरे वगैरे कोणितरी असेल. " नको दादा येणार आहे न्यायला, तु नको येऊ " (तिकडून येण्याबद्दल काहितरी बोलण झाल असाव) ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते अस म्हणून मी त्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला चालू केल! एखाद्याच्या personal गोष्टींशी आपल्याला काय करायच आहे.
बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अस्वस्थ वाटायला लागलेल होत. सहाजिकच आहे ना आता बघा की, एखाद्या कडे चांगली imported गाडी असेल तर रस्त्यावरून चालणाऱ्याला स्वतःच्या परिस्थितीची कीव येतेच की! ते बोलण ऐकायला जाऊ नये म्हणून मी एक पायरी उतरून खाली उभा राहीलो. मी काय पण तिथे उभारलेल्या सगळ्याच पुरुषांना तिच्या बोलण्याने अस्वस्थ केल होत. मला मात्र एक प्रश्न पडलेला, ह्या सगळ्या couples ना हा बाहेर कोसळणारा दुष्ट पाऊस एवढा सुखद का वाटतो?
माझ्याबद्दल बोलायच झाल तर मला पाऊस हा क्वचितच एखाद्यावेळी आल्हाददायक वगैरे वाटला असेल. इतर वेळी पाऊस हा केवळ मला त्रास द्यायलाच आला आहे अस वाटत राहिले आहे. अगदी शाळेत जाताना सुद्धा, सकाळी अगदी कोरड वातावरण असायच, शाळेत जायची वेळ आली की लागला धो धो कोसळायला. संध्याकाळीपण शाळेतून बाहेर पडतानाच पाऊस यायचा. शाळेत जातानाच ठीक आहे हो! पण घरी जाताना पण ? म्हणजे हा अन्यायच म्हणायचा की. तरी शाळा कशीतरी पार पाडली ह्याचा आनंद अधिक आहे. पुन्हा पुढे पुढे गाडी चालवायला शिकलो आणि मग पाऊस आणि माझ्यातल वेगळच वैर चालू झाल. सुरुवाती सुरुवातीला बाबा मला गाडी घेऊन जायला सांगायचे आणि मी घेऊन पण जायचो पण मी गाडी घेऊन, घरापासून लांब गेलो आणि त्याच वेळी पाऊस चालू असला की गाडी च चाक हमखास puncture होणे ठरलेल आहे. पावसात गाडी धकलत नेण्याचा जो त्रास आहे तो आता tubeless tyre च्या गाड्या वापरणाऱ्यांना नाही कळणार. एकवेळ मी भर उन्हात घाम येत असताना गाडी ढकलत जाईन पण पाऊस म्हणल की डोकच फिरत. आणि त्यात भरीस भर म्हणजे चश्मा , मला असणारा हा त्रास प्रत्येक चेश्मेवाल्याला असतोच असतो. पावसात गाडी चालवणे आणि पावसाचे थेंब जेव्हा चष्म्यातून ओघळतात त्या नंतर त्या काचेतून कसातरी रस्ता शोधणे खरच अतीअवघड.
त्यामुळ मला कधी कधी ह्या कवी लोकांच पण कळतच नाही, पाऊस हा केवळ प्रेमळ, आणि असा romantic वगेरेच कसा काय वाटतो? कदाचित ते कधी वादळी पावसात सापडलेच नसतील! कदाचित वीज त्यांच्या घराजवळ कुठे पडलीच नसेल! किंवा एका वर्षानंतर बरसलेल्या पावसामुळे त्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्यांनी अनुभवलाच नसेल! पाऊस! सामान्य माणसाच्या आयुष्यात फक्त प्रेमच नाही तर दुख: , सुख , अपघात अश्या खूप साऱ्या घटनांचा साक्षीदार असतो!
टीप: वरील लेखातील स्थान, व्यक्ती आणि प्रकृती ह्या बघितल्यासारख्या वाटत असल्या तरी उगाच डोक चालवून शोधायला जावू नये ! सापडल्यास मंडळ जवाबदार नाही ! ;)
बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अस्वस्थ वाटायला लागलेल होत. सहाजिकच आहे ना आता बघा की, एखाद्या कडे चांगली imported गाडी असेल तर रस्त्यावरून चालणाऱ्याला स्वतःच्या परिस्थितीची कीव येतेच की! ते बोलण ऐकायला जाऊ नये म्हणून मी एक पायरी उतरून खाली उभा राहीलो. मी काय पण तिथे उभारलेल्या सगळ्याच पुरुषांना तिच्या बोलण्याने अस्वस्थ केल होत. मला मात्र एक प्रश्न पडलेला, ह्या सगळ्या couples ना हा बाहेर कोसळणारा दुष्ट पाऊस एवढा सुखद का वाटतो?
माझ्याबद्दल बोलायच झाल तर मला पाऊस हा क्वचितच एखाद्यावेळी आल्हाददायक वगैरे वाटला असेल. इतर वेळी पाऊस हा केवळ मला त्रास द्यायलाच आला आहे अस वाटत राहिले आहे. अगदी शाळेत जाताना सुद्धा, सकाळी अगदी कोरड वातावरण असायच, शाळेत जायची वेळ आली की लागला धो धो कोसळायला. संध्याकाळीपण शाळेतून बाहेर पडतानाच पाऊस यायचा. शाळेत जातानाच ठीक आहे हो! पण घरी जाताना पण ? म्हणजे हा अन्यायच म्हणायचा की. तरी शाळा कशीतरी पार पाडली ह्याचा आनंद अधिक आहे. पुन्हा पुढे पुढे गाडी चालवायला शिकलो आणि मग पाऊस आणि माझ्यातल वेगळच वैर चालू झाल. सुरुवाती सुरुवातीला बाबा मला गाडी घेऊन जायला सांगायचे आणि मी घेऊन पण जायचो पण मी गाडी घेऊन, घरापासून लांब गेलो आणि त्याच वेळी पाऊस चालू असला की गाडी च चाक हमखास puncture होणे ठरलेल आहे. पावसात गाडी धकलत नेण्याचा जो त्रास आहे तो आता tubeless tyre च्या गाड्या वापरणाऱ्यांना नाही कळणार. एकवेळ मी भर उन्हात घाम येत असताना गाडी ढकलत जाईन पण पाऊस म्हणल की डोकच फिरत. आणि त्यात भरीस भर म्हणजे चश्मा , मला असणारा हा त्रास प्रत्येक चेश्मेवाल्याला असतोच असतो. पावसात गाडी चालवणे आणि पावसाचे थेंब जेव्हा चष्म्यातून ओघळतात त्या नंतर त्या काचेतून कसातरी रस्ता शोधणे खरच अतीअवघड.
त्यामुळ मला कधी कधी ह्या कवी लोकांच पण कळतच नाही, पाऊस हा केवळ प्रेमळ, आणि असा romantic वगेरेच कसा काय वाटतो? कदाचित ते कधी वादळी पावसात सापडलेच नसतील! कदाचित वीज त्यांच्या घराजवळ कुठे पडलीच नसेल! किंवा एका वर्षानंतर बरसलेल्या पावसामुळे त्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्यांनी अनुभवलाच नसेल! पाऊस! सामान्य माणसाच्या आयुष्यात फक्त प्रेमच नाही तर दुख: , सुख , अपघात अश्या खूप साऱ्या घटनांचा साक्षीदार असतो!
टीप: वरील लेखातील स्थान, व्यक्ती आणि प्रकृती ह्या बघितल्यासारख्या वाटत असल्या तरी उगाच डोक चालवून शोधायला जावू नये ! सापडल्यास मंडळ जवाबदार नाही ! ;)
Comments