Skip to main content

मी एकदा पावसात

दुकानात फक्त Parle-G चा पुडा आणायला गेलेलो, आणि पावसाने अचानक जोर धरला. भिजत जाव की नको असा विचार मनात आला पण म्हणल की कधी एवढ पळत जायच! जरा कमी आला की जाऊया म्हणून तिथेच थांबलो. जवळच मुलींची शाळा असल्यामूळे दुकानात गिर्ह्राईकांच्या ऐवजी मुलींचीच गर्दी अधिक. बघितल तर ८-९वी तल्या मुली असाव्यात, एकीने दप्तरामधून एक मोठा मोबाइल बाहेर काढला तो मोबाईल बघून चाटच पडलो. एवढा ग्रज्युएट झालोय पण अजून एवढा भारीतला मोबाईल घ्यायच धाडस होत नाही माझ आणि ही मुलगी अगदी हसत खेळत मोबाईल वापरत होती. तेवढ्यात तीला कोणाचातरी call आला, "हो अरे भिजत नाहीये मी, दुकानात थांबले एका!" तिकडून कोणितरी तीला भिजू नको अस सांगत होत. मला वाटल भाऊ, वडील वगेरे वगैरे कोणितरी असेल. " नको दादा येणार आहे न्यायला, तु नको येऊ " (तिकडून येण्याबद्दल काहितरी बोलण झाल असाव) ही काहीतरी वेगळीच भानगड दिसते अस म्हणून मी त्या बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करायला चालू केल! एखाद्याच्या personal गोष्टींशी आपल्याला काय करायच आहे.
बाहेर पावसाचा तडाखा वाढतच होता, आणि मला शेजारी उभारलेल्या त्या मुलीच्या फोन वरच्या बोलण्याने अस्वस्थ वाटायला लागलेल होत. सहाजिकच आहे ना आता बघा की, एखाद्या कडे चांगली imported गाडी असेल तर रस्त्यावरून चालणाऱ्याला स्वतःच्या परिस्थितीची कीव येतेच की! ते बोलण ऐकायला जाऊ नये म्हणून मी एक पायरी उतरून खाली उभा राहीलो. मी काय पण तिथे उभारलेल्या सगळ्याच पुरुषांना तिच्या बोलण्याने अस्वस्थ केल होत. मला मात्र एक प्रश्न पडलेला, ह्या सगळ्या couples ना हा बाहेर कोसळणारा दुष्ट पाऊस एवढा सुखद का वाटतो?
Rain

माझ्याबद्दल बोलायच झाल तर मला पाऊस हा क्वचितच एखाद्यावेळी आल्हाददायक वगैरे वाटला असेल. इतर वेळी पाऊस हा केवळ मला त्रास द्यायलाच आला आहे अस वाटत राहिले आहे. अगदी शाळेत जाताना सुद्धा, सकाळी अगदी कोरड वातावरण असायच, शाळेत जायची वेळ आली की लागला धो धो कोसळायला. संध्याकाळीपण शाळेतून बाहेर पडतानाच पाऊस यायचा. शाळेत जातानाच ठीक आहे हो! पण घरी जाताना पण ? म्हणजे हा अन्यायच म्हणायचा की. तरी शाळा कशीतरी पार पाडली ह्याचा आनंद अधिक आहे. पुन्हा पुढे पुढे गाडी चालवायला शिकलो आणि मग पाऊस आणि माझ्यातल वेगळच वैर चालू झाल. सुरुवाती सुरुवातीला बाबा मला गाडी घेऊन जायला सांगायचे आणि मी घेऊन पण जायचो पण मी गाडी घेऊन, घरापासून लांब गेलो आणि त्याच वेळी पाऊस चालू असला की गाडी च चाक हमखास puncture होणे ठरलेल आहे. पावसात गाडी धकलत नेण्याचा जो त्रास आहे तो आता tubeless tyre च्या गाड्या वापरणाऱ्यांना नाही कळणार. एकवेळ मी भर उन्हात घाम येत असताना गाडी ढकलत जाईन पण पाऊस म्हणल की डोकच फिरत. आणि त्यात भरीस भर म्हणजे चश्मा , मला असणारा हा त्रास प्रत्येक चेश्मेवाल्याला असतोच असतो. पावसात गाडी चालवणे आणि पावसाचे थेंब जेव्हा चष्म्यातून ओघळतात त्या नंतर त्या काचेतून कसातरी रस्ता शोधणे खरच अतीअवघड.
त्यामुळ मला कधी कधी ह्या कवी लोकांच पण कळतच नाही, पाऊस हा केवळ प्रेमळ, आणि असा romantic वगेरेच कसा काय वाटतो? कदाचित ते कधी वादळी पावसात सापडलेच नसतील! कदाचित वीज त्यांच्या घराजवळ कुठे पडलीच नसेल! किंवा एका वर्षानंतर बरसलेल्या पावसामुळे त्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्यांनी अनुभवलाच नसेल! पाऊस! सामान्य माणसाच्या आयुष्यात फक्त प्रेमच नाही तर दुख: , सुख , अपघात अश्या खूप साऱ्या घटनांचा साक्षीदार असतो!
टीप: वरील लेखातील स्थान, व्यक्ती आणि प्रकृती ह्या बघितल्यासारख्या वाटत असल्या तरी उगाच डोक चालवून शोधायला जावू नये ! सापडल्यास मंडळ जवाबदार नाही ! ;)

Comments

Unknown said…
Nice one Shardul...keep it up...waiting for next one..!
Thank You! Soon you'll get to read new one!

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

Social Media