Skip to main content

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय.

माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला?

कुठेतरी काहीतरी हरवतेय, 

मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय.

काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे...

नक्की ओळखायचं तरी कसं?

पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का?

काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत?

माणसं ओळखायची??

एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील.

कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे.

कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का?

आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय?

कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती?

"बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते"

हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं? 

मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आपला मुद्दा खरा करायला ओरडुन ओरडुन कोकळणाऱ्या अश्या सगळ्या माणसांना अगदी बघताक्षणी ओळखायचा आहे मला.

ही कला सगळ्यांनाच येतं असती तर पाठीत खंजीर खुपसयला येणाऱ्या जाती तयारच झाल्या नसत्या किंवा जागीच ठेचल्या गेल्या असत्या. पण ही कला खूप थोड्याच लोकांच्या जवळ असते म्हणून मग मनात कारस्थान करणारे फवतात, बळावतात आणि एखाद्या दुबळ्या मनाच्या माणसावर आघात करतात. अश्या माणसांकडे असतं नेमक माणूस ओळखायचं skill, म्हणून मग दुसऱ्याला कसं पकडायच ह्याच skill पण त्यांच्याकडेच असतं. ते बरोबर सावज हेरतात, त्याला मोकळा करतात आणि त्याचा मेंदुतला विचार करायचा भाग असतो तोच कापून टाकतात मग दुबळ्या मनाच गरीब सावज एकटं पडत आणि हारत. हे सगळं करून त्या शिकऱ्याला समाधान आणि असुरी आनंद सोडून काहीच मिळत नाही...

म्हणून म्हणतो माणसं ओळखायचा class असला पाहिजे, tution किंवा atleast crash course तरी असलाच पाहिजे त्याशिवाय शोधूनही सुख सापडणार नाही आणि वेळ जायच्या आधी दुःख ही टाळता येणार नाही...




Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media