Skip to main content

शाळेतले शिक्षक

शाळा सुटायला आली की दप्तराकडे जाणारे हात, त्यात भरल्या जाणारी वह्या आणि पुस्तकांची गर्दी आणि सगळ्यांनी दप्तर भरलेले बघून सरानी म्हणावे की "मी अजून १५ मिनिटे शिकवणार आहे"
किती राग यायचा ना? किती शिव्या दिल्या असतील त्या सरांना!
पहिली पासून दहावी पर्यंत अशा घटना जवळपास आठवड्यातून ३-४ वेळा तर घडायच्याच. शेवटचा तास अभ्यासिकेसाठी राखून ठेवायला शाळेने सुरु केल तेव्हा पासून हा दुसरा त्रास थोडा कमी झाला.
असे अनेक प्रसंग असतात, शाळेत वर्गात घडलेले, ग्राउंडवर खेळताना धडपडलेले, गृहपाठाची वही घरी विसरून आलेले आणि कधी परिपाठाच्या वेळी शाळेसमोर थाटात उभे असलेले पण ह्या सगळ्यात शिक्षक ही एक व्यक्ती constant असते.
गणित शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे, अगदी drawing शिकवणारे सुद्धा सगळे एकच! त्यांची रूप वेगवेगळी. जस देवाच असत ना तसच !
प्रत्येकाचा विषय वेगळा असतो पण ध्येय एकच असत,
"मुलाला घासून पुसून लक्ख करून ह्या जगात वावरायला तयार करणे" 

फक्त ह्या देवासाठी कोणताच उपवास किंवा पूजा करावी लागायची नाही कारण शिक्षकाकडे काही मागण्याची गरज च नव्हती, जे असायच ते त्यांनी खुल्या हाताने आणि मुक्त कंठाने विद्यार्थ्यांना देउ केलेल असायच.
मार तसा मिळायचाच पण त्याच्या मागे शिक्षकाची भावना त्या वयात उमगायचीच नाही. गदिमा म्हणतात ना,
"आधी तुडवी, तुडवी,
मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळ्याला
येई आकृती वेगळी"
कुंभारासारखच आपल्याला पण तुडवायला लागतच मगच येणारा आकार खुलून दिसतो.
मला तर अजुनही वाटत की जर इंग्रजीच्या तासाला मॅडम नी शब्द चुकल्यावर छडी दिली नसती तर कदाचित आंग्लभाषेसोबत कधीच सूत जमल नसत.
शाळेतल्या शिक्षकांच वेगळच काहीतरी वलय असत, कॉलेज मधे कितीही मोठे विद्वान प्राध्यापक असले तरी शेवटी शाळेत पाठीवर दोन गुद्दे देउन पाढे पाठ करायला लावणाऱ्या सरांची सर येतच नाही. शाळेसमोरून जातानासुद्धा दुपारी मिळणाऱ्या भाताचा वास येतो आणि आत जाऊन यायचा मोह आवरता येत नाही.
एवढ्या वर्षानंतर शाळा बदलते, शिक्षक बदलतात, शाळेचे नियम बदलतात पण तिथे गेल्यावर जग जेवढ निर्मळ आणि निरागस भासत ते कायम तसच राहत !!
आयुष्यात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे शिक्षक भेटतात आणि एवढ शिकून घेता येत आणि तरीही शिक्षक दिन साजरा करताना शाळेतल्या शिक्षकांची च आठवण येते!  कारण ती नाळ तशीच असते "Constant"



Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media