परिस्थिती चांगली म्हणावं तर तसही नाही आणि वाईट म्हणावं असाही नाही.
घरची ओढ, आणि नोकरी ह्याच्या मध्ये अडकलेली ही अवस्था.
Work From Home
हे शब्द ऐकले की काय आठवत आपल्याला?
कोरोना?
लॅपटॉप? की आरामात बसून केलेलं काम?
विचार करायला खूप सोपी पण अमलात आणायला थोडी शी किचकट संकल्पना आहे ना ही.
बघणाऱ्याला थोडं सोपं वाटेल, सहज वाटेल पण मुळात जो जगतो त्यासाठी कदाचित अवघड असेल.
आणि त्यात family सोबत नसाल तर थोडं अजून कष्टाच असेल.
रोज सकाळी उठणं, आवरून meeting attend करणं.
Meeting होता होताच 12 वाजतात मग स्वयंपाकाला लागणं. (हो माझाही हातभार असतो बनवण्यात😉)
करून झालं की जेवायचं आणि मग परत कामावर बसायचं.
एवढं सगळं होईपर्यंत २ वाजलेले असतात. आणि अर्धा दिवस संपलेला देखील असतो.
आणि ह्या सगळ्यात शेजारी राहणार कुटुंबात रोज काहीतरी चमचमीत बनत आणि आमच्या नाकाला उगाचच त्रास देऊन जात.
माझं गाऱ्हाणं सांगत नाही फक्त परिस्थिती सांगतोय.
ह्या कोरोना मूळ खूप काही शिकायला मिळालं.
स्वयंपाक ही फक्त एक बाजू. घराला संभाळण्यापासून अगदी भाजी आणणे, किराणा सामान भरणे आणि महत्वाचं म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं आणि तेच वापरणे.
आपल्या मित्रांच्यातले विविध गुण, कला (पाककला सुद्धा)
अगदी घर स्वच्छ ठेवण्यापर्यंत सगळं.
एरवी घर सांभाळत job करणाऱ्या स्त्रिया आपन बघतो, त्यांच्याबद्दल ऐकतो, त्या कस करत असतील आणि त्यांना काय काय करावं लागतं असेल ह्याच साक्षात practical मिळालं ह्या कोरोना/locdown मुळे.
घरी राहून घरच्या जेवणाला नाव ठेवताना, ती एक चपाती करायसाठी सुद्धा किती कष्ट असतात ते स्वतः करतानाच कळत नाहीतर नेहमी (आज चपाती नीट नाही झाली) ही तक्रार असतेच आपली.
ह्या सगळ्याची सुरुवात होते ती कणिक मळण्यापासून, पाणी जास्त झालं, पाणी कमी पडल, पीठ जास्त झालं अश्या अनेक गोष्टी घडतात पण तक्रार करताच येत नाही कारण करणारे आपणच असतो.
भाजीत मीठ कमी झालं आणि हळद जास्त पडली तरी खावचं लागत कारण ते आपणच केलेलं असत.
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत हे सगळ्यांनी ऐकलंय आपण पण नक्की किती पाणी येत ह्याचा अनुभव सुद्धा ह्या lockdown ने दिला.
जेवण, साफसफाई वगैरे करत काम करावं लागतं हा एक lockdown चा तोटा आहे. (काम आहे आपल्याकडे हे समाधानसुद्धा आहे)
कारण office वरुन घरी आल्यावर आपलं काम थांबतं, पण ह्या work from home मध्ये आपण २४ तास घरीच असतो त्यामुळे २४ तास कामासाठी available असतो.
कधीही फोन आला तरी काम करावं लागतं. (कधीही)
एवढं सगळं जमत कारण सगळे एकत्र होऊन करतो, कोणाच्या चांगल्या वाईट गोष्टी ना बघता, प्रत्येकाचं contribution ह्या परिस्थितीत तग धरून ठेवायला धाडस देत .
आणि मग कधीतरी मधूनच पावसाच्या वातावरणात चहा ची तलफ लागते आणि घरची आठवण येते.
डोळे बंद होतात आणि मन घराच्या चहाची चव आठवण्यात भरकटत.
मागून कोणीतरी हाक मारत आणि मग परत back to reality.
बाकी सगळं routine आहे तस चालू होतं आणि घराची आठवण आवाक्याबाहेर जायच्या आधी रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ येते.
आणि उधाण झालेलं मन कणिक मळताना हातातल्या पिठात मिसळून जात.
(टीप: तुमचं काय work from home आहे, म्हणजे निवांत, अगदी आडवं पडून काम असं वाटणाऱ्यानी एकदा असं राहून बघितलंच पाहिजे!)
![]() |
Comments