Skip to main content

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️

खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं,

मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली,

Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला,

त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ.

माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता.

बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.

 अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा.

दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता)

प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली" 

(विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान! 

नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय.

मग विवेक काकाकडून ऐकलेले किस्से चालू झाले, कसं रेल्वे च्या टपावर बसून अंगावर घोंगडं घेऊन आयोध्येतून परत आले सगळे.. सगळं किती धाडसी आणि किती उर भरून आणणारं आहे सगळं ते त्या लहान वयात खरंच कळत नव्हत, फक्त एवढं कळत होत की कोणीतरी बाबर अयोध्येचा मंदिराच्या जागी मशीद उभा करतो आणि शेकडो वर्षे लागतात ती पाडायला. 

२२ जानेवारी २०२४ हा दिवस ह्याच शेकडो वर्षांच्या अथक प्रयत्नांचा, संयमाचा, अधिरतेचा, संघर्षाचा फल स्वरूप आहे.

रामलल्ला तंबू मधून एका भव्य दिव्य मंदिरामध्ये जाणार.

काय आनंद होत असेल, आनंद नाहीच अत्यानंद होत असेल त्या अगणित वीरांना, कारसेवकांना. त्यांच्या कष्टाचं चीज झालं आज. आपण ह्या सगळ्यांवर चर्चा करतोय, टीव्ही वर पाहतोय, instagram वर शेअर करतोय, whatsapp च्या status ला ठेवतोय पण हे सगळं शक्य कोणामुळे आहे तर त्या असंख्य विरांमुळे, त्यांच्या ह्या लढ्या मुळे. कदाचित कोर्टाचा निर्णय आत्ता काही वर्षांपूर्वी आलाय पण त्यामागची जी तळमळ आणि जो संघर्ष आहे तो शेकडो वर्षांचा आहे. आपण आज भाग्यवान झालोय ते त्यांच्यामुळे. आज आपण संपूर्ण भारत राममय झालेला बघतोय ते त्यांच्यामुळे. त्या मंदिराच्या भूमिपूजन पासून ते आता प्राणप्रतिष्ठापना होईपर्यंत जे काही सगळं आपण अनुभवतोय ते त्या कारसेवकांमुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे.

कारसेवा आपल्याला सुद्धा करायला मिळायला हवी होती पण आता ते शक्य नाही किंवा त्याची गरजही नाही पण नशिबाने निधी संकलनाची जबाबदारी मिळाली.

सहजच एक आठवलं की रामजन्मभूमी च्या निधी संकलनात एका गावात गेलेलो तेव्हाचा अनुभव,

एका घरात गेलेलो, आणि तिथे त्या घराच्या पुरुषाने आम्हाला नाव विचारलं, आम्ही नाव सांगितलं. माझ नाव ऐकताच आतून एक छोटा (५-६ वी तला) मुलगा बाहेर आला आणि त्याने माझे पाय धरले, मी गोंधळलो, काहीच कळेना, हे असा काय ? मी त्याला उभा केलं आणि मग मी काही विचारायच्या आत त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, "Lockdown मध्ये कोणत्याच शाळेत ऍडमिशन मिळत नव्हत, मुलाचं वर्ष वाया गेलं असतं पण सरांना (माझे बाबा) एकदा भेटलो आणि त्यांनी ऍडमिशन दिली, त्यामुळं वर्ष गेलं नाही, पण सरांना भेटताच आल नाही"

माझ्या डोळ्यात पाणी भरून आल पण ते न दाखवत अजून काही लागलं तर सांगा मला असा म्हणत मी बाहेर पडलो.

म्हणूनच अभिमान वाटतो की आपण देशात वावरताना, वागताना, बोलताना, काम करताना सतत आपण ह्या देशाला काहीतरी दिलं पाहिजे ही भावना मला घरातूनच मिळाली.

आपण कधीतरी अस काहीतरी ऐकतो की खूप मोठं काम झालं चांगला काम झालं आणि आपला उर भरून येतो ना! तसा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलाय बाबांमुळे, काकामुळे, आणि दादांमुळे. 

आणि जन्मत:च संघाशी नाळ जोडलेली असल्यामुळं पाऊल दुसऱ्या वाटेला लागतच नाही. 

माझ्या बाबांनी, दादांनी(आजोबांनी), काकांनी काय केलं असं विचाराल तर सांगणं थोडं कठीण आहे, माणस तर कमावलीच पण आपल्या सोबत वावरणाऱ्यांना सुद्धा त्यांनी योग्य वाटेवर नेलं.

आणि अश्या लोकांचा सहवास मला लाभला आणि लाभतो आहे, ह्याच लोकांना बघत, ह्यांच्याकडून शिकत मी लहानाचा मोठा झालो ह्याचा मला अभिमान आहे.




Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media