काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं.
एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत.
खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं?
कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल?
म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही.
हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे.
आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो आणि चालू होतो शब्दांच्या जुळवाजुळवीचा खेळ.
एक वाक्य पुढच्या वाक्याच्या reference नी असल पाहिजे आणि मुख्य म्हणजे जसं ते डोक्यात आहे तसच्या तस टाईप झालं पाहिजे. आणि त्यात सुद्धा हल्लीच्या लोकांचा petience एवढा जास्त आहे की वाचक कंटाळून जाऊ नये म्हणून वेगळीच भीती.
सातत्य पाहिजे, रोज लिहिलं पाहिजे, किमान आठवड्यातून एकदा असा विचार करून आणि नियोजन करून झोपल की दुसऱ्यादिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पुन्हा तेच, काय लिहायचं.
जेव्हा काय लिहायचं हा प्रश्न सुटतो तेव्हा चालू होते काळजी कसं लिहायचं ह्याची. खुप अगदी हजारो पुस्तक वाचलीत अश्या लोकांपैकी मी नाही (म्हणजे अगदीच वाचत नाही असा नाही पण अगदीच त्यात बुडून जात नाही) असं असल्यामुळे शब्द आणि त्यांची जुळवाजुळव ह्यातच अर्धा वेळ जातो. सगळे शब्द बरोबर जमले की मग वाक्यरचना, व्याकरण, टायपिंग मिस्टेक वगैरे सगळे सोपस्कार करून शेवटी एकदा proof reading मग त्यात डोक्यात ज्या पद्धतीने आपल्याला वाक्य वाटत होती तशी नाहीत म्हणून पुन्हा सगळं erase करून पुनश्च हरी ओम. ही सगळी प्रक्रिया ३-४ वेळा आणि मग शेवटी बनवतो तो एक लेख किंवा एक ब्लॉग. मोबाईल वर टाईप करताना खूप मोठा वाटणारा लेख ब्लॉगर क्या साईट वर paste केला की अगदीच छोटा दिसतो पण मग तो वाढवयसाठी अजून शब्द शोधावे लागणार ह्या विचारानं तो लेख तसाच पोस्ट होतो, जसा आता होणार आहे तसा.
ह्या माझ्या ब्लॉग लिहिण्याच्या प्रोसेस मध्ये फक्तं एकच प्रयत्न प्रामाणिक असतो तो म्हणजे वाचनाऱ्याच्या मनापर्यंत पोचणे आणि पोचत नसेल तर तिचं त्या लेखकाची हार.
टीप :- काही सुधारणा हव्यात असं तुम्हाला नक्की वाटत असणार पण ते फक्त मला सांगायचं राहून गेलं असणार, ते खाली comment मध्ये लिहू शकता, किंवा मला मेल करू शकता (mandrupkarshardul4@gmail.com)
Comments