Skip to main content

"भाषा"कारण

 कर्नाटक म्हणजे फक्त कन्नड ( कन्नडा का नाही ते पुढे लिहिलंय) 

महाराष्ट्र म्हणजे मराठी पण ह्यात सगळ्यात कट्टर म्हणजे तमिळ तिथे हिंदी चा उच्चार सुद्धा चालत नाही.

हे सगळे विषय सतत ऐकू येत असताना, हातात एक पुस्तक आलं, ते म्हणजे "एक शून्य मी"

हे पुलंच पुस्तक वाचताना खूप सुंदर ओळ सापडली. पुल म्हणतात की, आपल्या भाषेवर प्रेम करणारा माणूस जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करू शकतो. म्हणजे आपल्या आईवर प्रेम करणाऱ्याला मातृत्व म्हणजे काय हे कळतं. पण आजकालच्या ह्या राजकारणात ३ भाषा, २ भाषा तर काहीठिकाणी एकच भाषा हा मातृभाषेचा वाद बघितला की वाटत, नक्की आपण त्याच देशात राहतो का की जिथे अनेकतेमधून एकता हा अभिमानाने मान उंचावणारा विषय आहे, की तो देश हरवला? 

कर्नाटकात फक्त कन्नड बोला, तामिळनाडू मध्ये फक्त तमिळ ,महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इतर राज्यात त्यांची त्यांची भाषा! आज कर्नाटक सरकारने सांगितलं की सगळे सरकारी आदेश हे कन्नड मधूनच काढायचे, आणि तुम्हाला काही सरकारी कचेरीत काम असेल तर कन्नड शिका आणि मगच या. आणि जो कन्नडच (कन्नडा नाही) कारण शेवटचा डा हा फक्त हेल काढून बोलायला सोपा जावा म्हणून आहे, असे माझे मत आहे. 

सध्या चालू असलेल्या शाळेत कोणती भाषा शिकवायची ह्या विषयावर बोलायचे तर हा विषय उकरून काढणाऱ्या माणसाला पहिल्यांदा शोधले पाहिजे. आम्ही मराठी शाळेत १० वी पर्यंत शकलो आणि आमच्या शाळेत मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या सगळ्या भाषा शिकवल्या जायच्या, हा आता जरी संस्कृत किंवा हिंदी असा पर्याय असायचा तरी ३ भाषा ह्या असायचाच की. मग आता नवीन काय? 

खरं तर ह्या बाबतीत मी पुलंनी लिहिलेल्या विचाराशी खूप सहमत आहे, ते म्हणतात सगळ्या राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासून ते दहावी पर्यंत पुस्तकात प्रत्येक भारतीय भाषेमधली एक एक कविता निवडून घालावी म्हणजे लहानपणापासून प्रत्येकाला प्रत्येक भाषेतील सौंदर्य कळेल आणि जो काय भाषेचा मी पणा आहे तो बंद होईल. 

आपली भाषा ही आपली आहे म्हणून तिचा अभिमान असलाच पाहिजे पण त्याचा अर्थ दुसऱ्या सगळ्या भाषा ह्या दुय्यम आहेत हे समजणे चुकीचे. मुंबई, बेंगलोर, पुणे, चेन्नई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये इतक्या भाषेची लोक राहतात की एखाद्यातरी शहरातून परप्रांतीय (परभाषीय) लोक बाहेर काढले तर त्या त्या राज्याची अर्थव्यवस्था कदाचित कोलमडून पडेल. 

बाकी, भाषेचा मुद्दा आणून खरोखर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरून लोकांचं लक्ष विचलित करणे हेच ह्या भाषेच्या राजकारणाच मुख्य कारण आहे. त्यामुळं आपण ह्यावर जास्त लक्ष नको द्यायला असा विचार करून चहा घ्यायला मी बाहेर पडतो आणि उडुपीमध्ये गेल्यावर टेबल पलीकडच्याने आपले इंग्रजी ऐकून आपल्याला दुर्लक्षित केलेले पाहून, "अण्णा वंदू tea कोडी" असं म्हणून, चहा च कूपन घेतो.




Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती ट...

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

Social Media