Skip to main content

आयुष्य थोड्या वेगळ्या वाटेने...!

लेखक जे काही लिहतो त्याच नवल तो सोडून इतर सगळ्यांना वाटत असत ... खर सांगू का? लेखकाला त्याच काहीच अप्रूप वाटत नसत. त्याच्यासाठी ते एखाद्या मराठीच्या पेपर मधल्या क्षुल्लक निबंधासारख असत ते. त्यामुळे जस परीक्षेत आपल्याला कळत नाही की निबंध काय लिहिला जातोय तसा लेखकाला सुद्धा काळात नसत की तो जे लिहितोय ते खरच इतर लोक वाचतील का? त्याच काम लिहीण आहे आणि आपल्यासारख्यांच काम ते वाचणं हे आहे. मघाशीच पु.ल. देशपांडेंच एक वाक्य वाचनात आल... कदाचित त्याच शीर्षक फसवणूक आणि हसवणूक अस होता पण वाक्याचा अर्थ समजून घेण खूप म्हत्वाच आहे असा मला वाटत. पु.ल. असा लिहितात, “जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमध्ये पकडून नियतिने चालवलेली आपणा सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” खरच बघा त्यानी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ ह्यात स्पष्ट केलाय अगदी. त्यांनी आयुष्यभर आपल्याला हसवलं आणि अजूनही त्यांची पुस्तकं, कथा आपल्याला अजून हसवतायत.
त्यानी आयुष्याची गाडी वेगळ्या पद्धतीने चालवली आणि ते यशस्वी झाले. जन्म ते मृत्यू असा प्रवास तर सगळेच करतात पण तोच प्रवास थोड्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वळणाने झाला तर त्याची मजा काही औरच...! असाच वेगळा प्रवास करताना जर आपण दुसर्याच्या पण उपयोगी  पडलो तर ते ही उत्तमच.
      मला तर स वाटत की विधात्याने माणूस तयार करतानाच त्याला स्वार्थी वृत्तीचा बनवलाय. कारण जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक गोष्ट ही माणसाला आकर्षित करत असते आणि तो त्या गोष्टीला आपलास करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो माणूस असा नसतो(एखादा अपवाद) तोच खर तर आपला विधाता असतो कारण तोच फक्त स्वतःचा विचार सोडून दुसर्याचा विचार करू शकतो. ह्यावरूनच व.पु.काळेंची एक कथा आठवतीये, कथेचे नाव आहे ‘जे.के.मालवणकर’. सगळी कथा सांगणं शक्य नाही पण आपल्या मुद्द्याशी सलग्न असलेला एक मुद्दा त्या कथेत आला म्हणून उदाहरणादाखल मांडतो. जे के मालवणकर महानगरपालिकेत नोकरीला असतात बरोबर १० तारखेला सगळ्यांचा पगार होतो. त्यांच्याच ऑफिस मधले त्यांचे सहकारी मित्र उदास होऊन बसलेले असतात कारण त्यांचा पगार चोरीला गेलेला असतो, प्रत्येक जण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सहान्भूते देत असत त्यांची विचारपूस करत असतात. अचानक जे.के.मालवणकर ऑफिस मध्ये येतात, मित्राच्या टेबल जवळ जातात आणि आपला सागळा पगार त्यांना देतात... इतर सगळे त्यांना विचारतात की जे.के.? तुम्ही असा का केलत? तेव्हा तो माणूस जे वाक्य बोलतो ते खरच विचार करण्याजोग आहे..तो म्हणतो, ”जेव्हा एखाद्याचा पगार चोरीला जातो तेव्हा पहिल्यांदा त्याला पगार द्यायचा असतो सहानभूती नाही.!“
      असाच विचार प्रत्येकाने केला तर एखादा अडचणीत असताना आपण मागे-पुढे न बघता त्याला मदत केली तर? तर आपले काहेच वाईट होणार नाही उलट दीर्घकाळ टिकणारा फायदा होईल. ह्यासाठीच थोडा वेगळा जगुन बघा दुसरयांच्या उपयोगी पडा, तुम्हाला तुमच वय थोडा कमी झाल्यासारखं जाणवेल....
धन्यवाद....!


   

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media