Skip to main content

एका चेहर्याची ओळख

            आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर ती तिच्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून होती. आणि मग conductor जास्तच खेकसला, बिचारा पास पंच करायला मगाचपासून उभा होता.
              आता एव्हाना अर्धा रस्ता पार झालेला, पण मनातली घालमेल अजून चालूच होती. बोलू की नको बोलू हा एकच सवाल मनात घुटमळत होता. शेवटी धाडस केलं, तिच्याकडे बघितलं, योगायोगाने तिने पण माझ्याकडे बघितलं . तिनं माझ्याकडे बघितल यानेच दचकून मी पुढे बघायला लागलो. माझी तारांबळ तिच्या लक्षात आली, तिच्या ओठावर हलकेच हसू उमटलं आणि मलाही माझच हसू आलं. थोडा सावरून बसलो, इस्लामपूर आता जास्त लांब नव्हतं फार फार तर ३-४ किमी राहिले असतील पण अजूनही तिच्याशी बोलणं शक्य झालं नव्हतं. मनात असा पण विचार येत होता की परत अशी संधी येणे नाही पण मग एक मन अस पण सांगत होता की तिच्यामध्ये गुंतून माझा वेळ तर वाया घालवत नाही ना!
इस्लामपूर स्टँड मध्ये बस शिरली , मी पण जागेवरून उठलो आणि बस मधून उतरायला दरवाज्याजवळ गेलो. तिच्याकडे एक नजर फिरवली पण ती दिसलीच नाही. तेव्हापासून आजपर्यंत बस मध्ये बसल्यावर तिला माझी नजर हुडकते आणि मग परत विचार येतो, दिसली नाही तेच बरं झालं!

अर्झ किया है।

" जुल्फो मैं उसके वह नशा चढ गया है।
दर्द ए दिल की जैसे दवा बन गया है।
ख्वाहिश् है, अरमान भी तो हैं मन मैं।
लफझो को जुबाँ पर लाने का बस ऐतबार हैं। "

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media