Skip to main content

सुख


     सुख म्हणजे नक्की काय हो?
खूप सारी श्रीमंती? मोठी गाडी? भरपूर पगार? की मग आपली सुंदर बायको?
     नक्की काय?
मनातल्या मनात सुखाचे मनोरे बांधायचे कितीही प्रयत्न केले तरी प्रत्यक्षातल सुख काही वेगळच असत ना!
     एखाद्या दिवशी उशिरा उठून आलेला आळस झटकून न देता तसेच उठून (आवरून) तुम्ही गाडी ला किक मारून officeला जाता आणि तिकडे गेल्यावर कळत की आपला team leader तर आज नाही आलेला, आणि त्यानंतर जो निवांत दिवस तुम्ही घालवता ना तेच हे जे काही असत ते “सुख”!

       खूप प्रयत्नानंतर, अगदी डोक्याच दही करून तुम्ही एखादा code करता आणि तो successfully compile होतो, आणि त्यानंतर जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर खुलून येत ना तेच हे सुख!

अहो एवढ कशाला, तुमची गाडी, जी कधीही एका किक मध्ये चालू होत नाही, आणि office मधून घरी जाताना बरोबर वेळेत एकाच दणक्यात ती स्टार्ट होते ना, तेव्हा जो आनंद त्या गाडीच्या vibration सोबत चढत असतो ना त्याला म्हणतात सुख!

         आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आतुरतेने ज्याची आपण वाट बघत असतो अश्या पगाराचा text  येतो आणि तेव्हा तो आलेला मेसेज आपण आपल्या वडीलांना दाखवतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो नकळत येणारा अभिमान असतो ना ते असत सुख!

     आजूबाजूलाच असत पण शोधाव लागत म्हणून आपल्या सापडत नाही! जे आभासी आहे ते प्रत्यक्षात आपल्याला तेवढ समाधान देईलच कशावरून?
मनात शंका येतेच ना की आज आपण 40,000 चा मोबाईल घेतोय, उद्या त्याच नवीन मोडेल येईल मग तेव्हा हे जुना मॉडेल आपल्याला तेवढाच आनंद देईल?

      एखाद्या होस्टेल वरती राहणाऱ्या त्या विद्यार्थ्याला विचारा, तो सांगेल खर सुख कशात असत! आई च्या हातून बनलेल्या कारल्याच्या भाजी पेक्षा होस्टेल ची खीर कधीच चविष्ठ असू शकत नाही!

कधी सुखी माणूस बघितलाय? तो सुखी आहे हे तुम्ही कस ओळखता? त्याचा हसरा चेहरा बघून? की त्याच्या डोळ्यातली चमक बघून? 

शेवटी काय तर, सुख ही कोणती वस्तू नाही की जी तुम्ही मिळवू शकाल किंवा कोणीतरी तुम्हाला आणून देईल, सुख हा एक भास आहे, सुखी असण ही एक भावना आहे!

Because it is something, you can only pursue!



Comments

Kartik said…
कडकं......

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media