Skip to main content

"महा"पूर

माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या.
आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला.
आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्यावर चढलो. फक्त एक क्षण, आणि डोळ्यापुढे काजवे चमकावेत तसा चक्कर येउन खाली बसलो.
" माझ गाव " कोणीच कधीच अस स्वप्नात देखील पाहील नसेल, मी ज्या शाळेत गेलेलो ती शाळा देखील पाणी साचून, साचून नव्हे तर पाण्यात बुडून बंद पडलेली.
आणि उतारावरची घर पत्त्याचा बंगला पडावा तशी कोलमडून पडलेली.
आत्तापर्यंत "मी" आणि "माझ" करण्यात आयुष्य घालवल , आता ही परिस्थिती बघून अहंकार पार बुडाला.
पुढच्या बोटीची वाट मी अशीच बघावी म्हणून घरात सापडलेली एकच छत्री उघडून पत्र्यावरच बसलो.
पहीला दिवस कसा पार पडला कळल देखील नाही पण येणारा दिवस अंत बघणारा असेल हे निश्चित होत.
विचार चालूच होते, तेवढ्यात लांब वर काही बॅटर्यांचा प्रकाश दिसला, मी देखील माझ्या फोन ची बॅटरी ऑन केली, शिंद्यांच्या ४ मजली बंगल्यामध्ये १०-१२ जण होते (अंदाजे) आणि ते देखील कदाचित त्याच बोटीची वाट बघत होते.
त्याना बघता क्षणी थोड निवांत वाटल. रात्री उशीरा पावसाचा जोर कमी झाला आणि मी पुन्हा पत्र्यावर पुन्हा चढलो. क्षणासाठी तो अंगाला झोंबणारा, थैमान घालणारा वारा अल्हाददायक वाटायला लागला. तसाच खाली बसलो.
"काय मिळवल मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात? पैसे? ते तर आता कष्ट केले नाहीत तरी मिळतात मग काय? गावात respect ? ती तर वाडवडीलानी कमवलेली, मग माझ काय?
स्वतःच अस मी काय केल?
जे काही होत नव्हत ते सगळच कृष्णा घेउनच चालली आता. अगदी पत्र्याला टेकायला आलेल्या पुराच्या त्या लाटा, त्यात अहंकार वाहून गेला आणि मी साफ झालो.
थोड हलक वाटल आणि पुराशी दोन हात करायला अजुन जोर चढला.
खर सांगू का? आपल्याला एवढ्या लवकर कोणतीही मदत मिळणार नाही ही भावनाच खूप भयानक असते.
पण परिस्थितीशी जुळवून घ्याव लागत आणि लढाव लागतच.
NDRF च्या Team ७ दिवसांनी बोटी घेऊन आल्या, तोपर्यंत मी एकटा तिथे परिस्थितीशी आणि माझ्या मनस्थितीशी लढत होतो!
बाहेर आल्याबरोबर समोर दिसणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच हसू पाहून ताकत वाढतच गेली.
रक्तात लढायची सवय भिनली असल्याने हार मानायला मन तयारच होत नाही. कोणी मदतीला आहे किंवा नाही हे न बघता स्वतः स्वतःची मदत करून सावरून इतरांनाही सावरायची ताकत ह्या सांगली आणि कोल्हापूरच्या मातीत आहे आणि ती आमच्या रक्तात आहे!



Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media