Skip to main content

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय?

फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी?

पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.?

श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस?

कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव?

खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते.

व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”.

छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो.

निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की!

पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात.

त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणारे.

अश्या लोकांना नक्की भविष्य दिसत असणार कारण दिवस उजाडायच्या आतच, म्हणजे फाल्गुन आमवास्येलाच ही लोक चैत्र प्रतिपदेत पोचलेली असतात. इंग्रजी नवीन वर्षासोबत भारतीय नवीन वर्ष जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असं वाटतो कि जस के त्यांच्या घरी दर वर्षी १ जानेवारी ला ब्रिटिश भेट देऊन जातात.

ह्यांच्या नंतर असतात ते म्हणजे उत्साही लोक. ही माणस पहाटे पहाटे उठतात, अगदी अक्षरश: सूचिर्भूत होऊन मग घरातल्या इतर लोकांना उठवायला धावतात. आपण कितीही लवकर उठलो असू तरी फुलांची खरेदी करायला घरातल्या सगळ्यात उशिरा उठणाऱ्या मुलाला/मुलीला पाठवतात आणि वरुन टोमणा असतोच कि, “आज पाडवा आहे, आज तरी लवकर उठा”. ह्या लोकांना उठल्या उठल्या चहा लागतो म्हणून अशी लोक, घरातल्या स्त्रियांना सुद्धा पहाटे ५ वाजता उठवतात. स्वच्छ धुवून इस्त्री केलेला कुर्ता घालून घरच्या दरवाज्यात पेपर वाचत बसतात. (गुढी उभ करायच काम मात्र दुसऱ्यांकडे.)

हयानंतर येतात ते अतिउत्साही लोक. पण ह्यांच्याकडे कारण पण तस असत. घरामध्ये नवीन वस्तूंची, नवीन वास्तूंची, वाहनाची खरेदी गुढी पाडव्याला होत असते, त्या घरातला “New Member in house" चा उत्साह तर ओसंडून ओसंडून शेजारच्यांचा जळफळात विझेपर्यन्त वाढलेला असतो, मग त्यांचा Whatsapp Status आणि Instagram Stories ना ऊत आलेला असतो. आणि मग नंतर चा एक अख्खा महिना त्याच नवीन गोष्टी सांभाळण्यात आणि ते आम्ही कस सांभाळतो हे दाखवण्यात जातो.

ह्या सगळ्या नंतर येतात ती शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेर गावी राहणारे विद्यार्थी किंवा “Corporate मजूर” ह्यांना सुट्टी मिळालेली नसते आणि त्यामुळे घरी जाता आलेल नसत. घरच्या लोकांनी पाठवलेल्या stories आणि स्टेटस बघण्यात ह्यांचा अर्धा दिवस जातोच. वरून घरून गोडधोड जेवणाचे फोटो येत असतात, ते बघत बघत उरलेला अर्धा दिवस जातो, असुदे जाऊ पुढच्या वेळी घरी असं स्वत:ला समजवतात आणि तेच शेजारच्या खानावळीतून आणलेले चपाती, भाजी खायचे.

 

सगळ्यांचा गुढी पाडवा असं वेगवेगळा असतो पण भाव same असले की पाडव्याचा महोत्सव सगळीकडे अनुभवायला मिळतो.

जस पु ल म्हणतात तस, शेवटी काय तर फक्त झाडांना फुटते तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.




Comments

Anonymous said…
Nice

Popular posts from this blog

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस . कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस.  मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ? ४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.! Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार! Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती टोमॅट

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य

Fear of Success

              Life is not simple but its not even impossible to live. Its not like we can just feel it, It is what we see everyday, what we speak everyday, how we behave, how we express. Life is a game of hurdles. To win, you have to cross every difficulty which come in your way. But if you keep thinking how your life is gonna respond to your situation then that's the point where you will lose. Because one wise man once said and I quote, "Life is tragedy to those who thinks but comedy to those who feels..!!!" It is not necessary to always think before you act but beauty of life depends on your reactions on other's action.              Life is only game where "losing" is not an option. Here, you neither lose nor always win. Everyone actually want to achieve success or something extra-ordinary in thier lives but not everyone gets what he desires. There is one thing which I have observed that people never fear of failure but actually they fear of success. Th

Social Media