गुढी पाडवा म्हणजे नक्की काय?
फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी?
पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.?
श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस?
कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव?
खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते.
व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी
फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”.
छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी
साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ
शीळ घालायला चालू झालेला असतो.
निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत?
१ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की!
पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात.
त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर
शुभेच्छांचे status ठेवणारे.
अश्या लोकांना नक्की भविष्य दिसत असणार कारण दिवस उजाडायच्या आतच, म्हणजे फाल्गुन
आमवास्येलाच ही लोक चैत्र प्रतिपदेत पोचलेली असतात. इंग्रजी नवीन वर्षासोबत भारतीय
नवीन वर्ष जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असं वाटतो कि जस के त्यांच्या घरी दर वर्षी १
जानेवारी ला ब्रिटिश भेट देऊन जातात.
ह्यांच्या नंतर असतात ते म्हणजे उत्साही लोक. ही माणस पहाटे पहाटे उठतात, अगदी
अक्षरश: सूचिर्भूत होऊन मग घरातल्या इतर लोकांना उठवायला धावतात. आपण कितीही लवकर उठलो
असू तरी फुलांची खरेदी करायला घरातल्या सगळ्यात उशिरा उठणाऱ्या मुलाला/मुलीला पाठवतात
आणि वरुन टोमणा असतोच कि, “आज पाडवा आहे, आज तरी लवकर उठा”. ह्या लोकांना उठल्या उठल्या
चहा लागतो म्हणून अशी लोक, घरातल्या स्त्रियांना सुद्धा पहाटे ५ वाजता उठवतात. स्वच्छ
धुवून इस्त्री केलेला कुर्ता घालून घरच्या दरवाज्यात पेपर वाचत बसतात. (गुढी उभ करायच
काम मात्र दुसऱ्यांकडे.)
हयानंतर येतात ते अतिउत्साही लोक. पण ह्यांच्याकडे कारण पण तस असत. घरामध्ये नवीन
वस्तूंची, नवीन वास्तूंची, वाहनाची खरेदी गुढी पाडव्याला होत असते, त्या घरातला “New Member in house" चा उत्साह तर ओसंडून ओसंडून शेजारच्यांचा जळफळात विझेपर्यन्त वाढलेला
असतो, मग त्यांचा Whatsapp Status आणि Instagram Stories
ना ऊत आलेला असतो. आणि मग नंतर चा एक अख्खा महिना त्याच नवीन गोष्टी
सांभाळण्यात आणि ते आम्ही कस सांभाळतो हे दाखवण्यात जातो.
ह्या सगळ्या नंतर येतात ती शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेर गावी राहणारे विद्यार्थी
किंवा “Corporate
मजूर” ह्यांना सुट्टी मिळालेली नसते आणि त्यामुळे घरी जाता आलेल नसत.
घरच्या लोकांनी पाठवलेल्या stories आणि स्टेटस बघण्यात ह्यांचा
अर्धा दिवस जातोच. वरून घरून गोडधोड जेवणाचे फोटो येत असतात, ते बघत बघत उरलेला अर्धा
दिवस जातो, असुदे जाऊ पुढच्या वेळी घरी असं स्वत:ला समजवतात आणि तेच शेजारच्या खानावळीतून
आणलेले चपाती, भाजी खायचे.
सगळ्यांचा गुढी पाडवा असं वेगवेगळा असतो पण भाव same असले
की पाडव्याचा महोत्सव सगळीकडे अनुभवायला मिळतो.
जस पु ल म्हणतात तस, शेवटी काय तर फक्त झाडांना फुटते तशी नवी पालवी मनाला फुटली
पाहिजे.
Comments