Skip to main content

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय?

फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी?

पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.?

श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस?

कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव?

खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते.

व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”.

छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो.

निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की!

पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात.

त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणारे.

अश्या लोकांना नक्की भविष्य दिसत असणार कारण दिवस उजाडायच्या आतच, म्हणजे फाल्गुन आमवास्येलाच ही लोक चैत्र प्रतिपदेत पोचलेली असतात. इंग्रजी नवीन वर्षासोबत भारतीय नवीन वर्ष जोडण्याचा त्यांचा प्रयत्न असं वाटतो कि जस के त्यांच्या घरी दर वर्षी १ जानेवारी ला ब्रिटिश भेट देऊन जातात.

ह्यांच्या नंतर असतात ते म्हणजे उत्साही लोक. ही माणस पहाटे पहाटे उठतात, अगदी अक्षरश: सूचिर्भूत होऊन मग घरातल्या इतर लोकांना उठवायला धावतात. आपण कितीही लवकर उठलो असू तरी फुलांची खरेदी करायला घरातल्या सगळ्यात उशिरा उठणाऱ्या मुलाला/मुलीला पाठवतात आणि वरुन टोमणा असतोच कि, “आज पाडवा आहे, आज तरी लवकर उठा”. ह्या लोकांना उठल्या उठल्या चहा लागतो म्हणून अशी लोक, घरातल्या स्त्रियांना सुद्धा पहाटे ५ वाजता उठवतात. स्वच्छ धुवून इस्त्री केलेला कुर्ता घालून घरच्या दरवाज्यात पेपर वाचत बसतात. (गुढी उभ करायच काम मात्र दुसऱ्यांकडे.)

हयानंतर येतात ते अतिउत्साही लोक. पण ह्यांच्याकडे कारण पण तस असत. घरामध्ये नवीन वस्तूंची, नवीन वास्तूंची, वाहनाची खरेदी गुढी पाडव्याला होत असते, त्या घरातला “New Member in house" चा उत्साह तर ओसंडून ओसंडून शेजारच्यांचा जळफळात विझेपर्यन्त वाढलेला असतो, मग त्यांचा Whatsapp Status आणि Instagram Stories ना ऊत आलेला असतो. आणि मग नंतर चा एक अख्खा महिना त्याच नवीन गोष्टी सांभाळण्यात आणि ते आम्ही कस सांभाळतो हे दाखवण्यात जातो.

ह्या सगळ्या नंतर येतात ती शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेर गावी राहणारे विद्यार्थी किंवा “Corporate मजूर” ह्यांना सुट्टी मिळालेली नसते आणि त्यामुळे घरी जाता आलेल नसत. घरच्या लोकांनी पाठवलेल्या stories आणि स्टेटस बघण्यात ह्यांचा अर्धा दिवस जातोच. वरून घरून गोडधोड जेवणाचे फोटो येत असतात, ते बघत बघत उरलेला अर्धा दिवस जातो, असुदे जाऊ पुढच्या वेळी घरी असं स्वत:ला समजवतात आणि तेच शेजारच्या खानावळीतून आणलेले चपाती, भाजी खायचे.

 

सगळ्यांचा गुढी पाडवा असं वेगवेगळा असतो पण भाव same असले की पाडव्याचा महोत्सव सगळीकडे अनुभवायला मिळतो.

जस पु ल म्हणतात तस, शेवटी काय तर फक्त झाडांना फुटते तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.




Comments

Anonymous said…
Nice

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media