Skip to main content

बाबा

 कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत.

आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत. 

आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही. 

देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही. 

भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं. 

ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शिकवणी काय पण साधा crash course देखील मिळत नाही.

काल दुपारी अचानक भीती वाटली की बाबा एवढे लांब गेले का की आता त्यांचा आवाज ही विसरायला होतोय? सगळे सांगतात move on करायचं. पण एक म्हण आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जोपर्यंत आधार आहे हा एक confidence असतो तोपर्यंत कोणताही धाडस करायला काहीच वाटत नाही पण तो आधार एकदम गेला तर? अडखळतोच ना माणूस? 

पण तस होऊन चालत नाही, मनातून कितीही भीती वाटत असली तरी आता अंधारात वाट शोधावी लागते, आपण किती strong आहोत हे दाखवाव लागत नाहीतर सगळ घर कोसळत आणि बाहेरचे वारे आत घुसून धुमाकूळ घालून जातात. 

अडचणीत बाबा आठवतात पण त्यांच्या साठी जे काय काय करायचं होत, त्यांना काय काय करून दाखवायचं होतं ते करताच आलं नाही हे digest होतंच नाही. अजुनही वाटत की बाबांचा एक कॉल यावा आणि त्यांनी म्हणावं मी आहे तू कर. मी सगळ लढायला तयार आहे पण फक्त त्यांनी येऊन म्हणावं की तू लढ.

मी कायम प्रयत्न करत राहीन त्यांनी जस सगळ सांभाळलं तसच सांभाळायचा, कधीही न तुटायचा पण कधी कधी येतात असे प्रसंग की तेव्हा बाबा तुम्ही हवा होतात. 

तुम्ही एकदा फक्त या आणि बोला माझ्याशी, मला सगळे प्रश्न सोडवायचेत पण मार्ग पुसट होत चाललेत. मी अडकलोय आणि सुटायच कस माहिती नाही. फक्त एक मार्ग दाखवा.

Comments

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media