Skip to main content

ते शेवटचे दिवस

आज class मध्ये बसून पण थोड एकट एकट वाटल. मुल थोडी कमीच होती, जी होती ती आपल्याच नादात होती पण मी तिथे एकटाच होतो. आज जाणवल , शेवटचा महिना, शेवटचे ३०-४० दिवस, college मधल्या त्या वातावरणात वेळ घालवायाची शेवटेची संधी. त्या बेंच वर बसून दंगा करायचे शेवटचे दिवस. कुठे कोणाशी झालेल भांडण मिटवायच असेल किंवा अबोला सोडायचा असेल तर शेवटचे सोनेरी दिवस. 
मनात थोडी भीती वाटते आज... रोज सकाळी बस मध्ये बसून college च्या stop वर उतरायची सवय मोडावी लागणार काही दिवसात. Lecture तर दूर पण त्या बदाम चौकाततरी आपल्याला कोणी ओळखेल का? मित्रांना मुक्त पणे शिव्या देत फिरण्याचे दिवस संपणार.. lipton वर दर संध्याकाळी केलेला चहा- नाश्टा परत रोज नाही मिळणार. उमेश दादाशी गप्पा मारत घालवलेले दिवस college संपल्यावर पुन्हा कधी मिळणार ?
४:१५ नंतरची classtest आणि मध्येच मुसंडी मारणार्या midsem आपण परत कधीच नाही देणार.!
Ground वरच्या बेंच वर बसून केलेला timepass परत नाहीच होणार!
Lunch Break मध्ये डबा खाण्याचा बेत कदाचीत नाहीच करता येणार. नीरज्याच्या डब्यातील roll, वैभव च्या डब्यातल्या चपात्या, कुलदीप ची आवडती टोमॅटोची भाजी, अश्या च्या आवडीची पुरणपोळी ह्या सगळ्याची चव जगात कुठल्याच hotel मध्ये मिळणार नाही. आणि ५:३० मिनीटांचा आमचा जेवायचा record कोणीच मोडु शकणार नाही. डबा खाऊन झाल्यावर हनुमान ला जाऊन चहा पिण्याचा योग बहुतेक जमणारच नाही. admin मध्ये exam fee ची वरदळ, आणि cashier जवळची गर्दी तशीच असेल पण त्या गर्दीत आपण नसू. बदाम चौकात त्या ground च्या पायर्यांवर बसल्यावर कदाचित ती हिरवळ ही दिसणार नाही. वर्गात, आणि college मध्ये तयार झालेले crush क्वचितच दिसतील.
लिहिता लिहिता पण डोळ्यात पाणी आल, ४ वर्ष ज्या college ला शिव्या दिल्या , ते सोडून जाताना एवढा मोठा आवंढा का येतो ? का डोळे भरून येतात? मित्र, मैत्रीणी आणि शिक्षकांना गमवण्याच्या भितीने का उर भरून येतो?
Engineering करता करता इतका emotional कधी होतो कळतही नाही. म्हणूनच म्हणतात ना,
"FE ला छोटे असतो, SE ला मोठे झाल्यासारखे वाटत, TE तर SE वर दादागिरी करण्यात निघून जाते, पण BE आयुष्याला वळण देउन जाते.."
काही जण campus मध्ये place होतात, काहीजण exam crack करून Mtech/MBA करायला जातात, प्रत्येकाची वाट वेगळी होते, नाती हो हो म्हणता दुरावतात. पण काहीजण असेच मधल्या मधे अडकतात.
मागच्या वर्षी send off ला seniors एवढे का रडले हे आता समजतय, एक वेगळीच जाणिव होते, ह्या बाहेरच्या जगात पाऊल ठेवायला एकट्यालाच धडपडायच आहे. College मध्ये सावरायला खुप जण असतात पण बाहेर सावरायच पण आपण च असत आणि पडायच पण आपण च असत.
बदल प्रत्येकाच्या आयुष्यात होतात, college संपणे हा पण एक बदलच आहे पण हा बदल आपण थांबवू शकत नाही, याची खंत मनात कायम राहते.
मित्रांच्यातल अंतर वाढत हे नक्की असत पण सोबत नाही सुटत, मित्रांच्यातला तो गुप्त करार कायम पक्का असतो.. म्हणून प्रत्येकाला हेच सांगतो की college संपल म्हणजे आयुष्य संपत नाही, पुन्हा कुठेतरी भेटू आयुष्यातली सुखदुख परत एकमेकांशी वाटू. पण सोबत कायम राहू...!
हा blog वाचून खूप जण मला ओरडणार आहेत पण कधीतरी भावनेच्या भरात खूप खूप चांगल्या गोष्टी घडून जातात! 

Comments

Unknown said…
Speechless😢😢
Unknown said…
Emotional ...... no words to say ...... grate
Murgesh said…
������ too much emotional, miss u all
Thank you all!!! Miss u too Murgesh
Unknown said…
😐😥😖😖😖😖😢😢😢😢😢😢😢😢😢
Anonymous said…
Heart touching...
Unknown said…
yaar Shardul... Rula diya bhai...emotional zalo hi post vachun. Imagine pn karu shakat nahi ki college che diwas sampnar aahet.... Saglyanchya manatale tu olakhun tu lihilays.. 1 number lihilays.... :-)
Unknown said…
Ek no. ....I'm gonna too miss my clg days..bt after 1year😂
Unknown said…
Awesome.
Heart touching.
Unknown said…
Writer keep it ...Keep doing.. nice , awesome ,1 no.
Thank you Ashish and Ganesh!
Komal Bhasme said…
It is too good shardul...������
Sakha said…
एकदम सही... heart touching
Unknown said…
Really Nice ☺☺☺����
सर्वाना धन्यवाद
Unknown said…
Shardul too good..heart touching.. missing clg days
It was amazing blog every thing you shared was awesome one and every small parts of engg.life you've put creatively.
Thank for sharing this.keep it up
Thank you for encouragement Ashish

Popular posts from this blog

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

Social Media